राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या 'आनंददायी शनिवार' या उपक्रमाचा विस्तार करणेबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 9 डिसेंबर २०२५ रोजी पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.
संदर्भ
:- १) शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२४/प्र.क्र.१२६/एसडी-४. दिनांक १४ मार्च, २०२४.
२) शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२५/प्र.क्र.३०५/एसडी-४, दिनांक १ ऑक्टोबर, २०२५
प्रस्तावना :-
विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या वर्तन व जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी, स्वयंशिस्त, सहकार्याची वृत्ती, नेतृत्वगुण यांचा विकास व्हावा या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवार हा 'आनंददायी शनिवार' म्हणून साजरा करण्यात यावा अशा सूचना संदर्भ क्र. १ येथील शासन परिपत्रकान्वये देण्यात आलेल्या आहेत. सदर उपक्रमाचा विस्तार करण्यात येऊन, या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याकरिता, विद्यार्थ्यांच्या इच्छुकतेनुसार करावयाच्या अतिरिक्त कृती कार्यक्रमांचा समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन परिपत्रकः-
राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या 'आनंददायी शनिवार' या उपक्रमाचा उद्देश तसेच त्या अंतर्गत करावयाच्या कृती याविषयी संदर्भ क्र. १ येथील परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात आलेल्या आहेत. राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहशालेय मूल्य आधारित उपक्रमांची ओळख करून देणे, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता, सामाजिकता, व्यावहारिक कौशल्ये आणि नेतृत्व गुण विकसित करणे या उद्देशाने 'आनंददायी शनिवार' या उपक्रमाअंतर्गत खालील अतिरिक्त नावीन्यपूर्ण कृतींचा शालेय स्तरावर समावेश करण्यात यावा.
१) पालक मेळावा :
वर्षातून किमान दोन वेळा पालक मेळावे घेण्यात यावेत.
मेळाव्याचा उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच भावनिक, सामाजिक व करिअर संबंधी
मार्गदर्शन करणे हा असावा.
पालकांना विद्यार्थ्यांशी संवादासाठी उपयुक्त विषय द्यावेत. उदा.
> मुलांचे स्क्रीन टाईम नियंत्रण
> अभ्यासाची सवय
> किशोरवयातील बदल
> मानसिक आरोग्य
> पालक-शाळा भागीदारी
लघु उद्यम महोत्सव / विज्ञान प्रदर्शन / कला प्रकल्प यासारखे उपक्रम आयोजित करता येतील.
२) स्नेहसंमेलन :
वर्षातून एकदा शाळास्तरीय सांस्कृतिक स्नेहसंमेलन आयोजित करावे.
सर्व विद्यार्थ्यांना रंगभूमी, क्रीडा कौशल्ये, कलाविष्कार याबाबत संधी मिळेल याची दक्षता घ्यावी. कार्यक्रमामध्ये लोककला, लोकनृत्य, नाटिका, एकांकिका, कवी संमेलन, वाद्यकला, चित्रप्रदर्शन यांचा समावेश असावा,
विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि माजी विद्यार्थी यांचा सहभाग वाढावा यासाठी प्रोत्साहन द्यावे.
३) देशभक्तीपर गाण्यांवर कवायत, योगा, व्यायाम, सैनिकी प्रशिक्षण, एन.सी.सी / स्काऊट गाईड
धर्तीवर परेड :
विद्याथ्यर्थ्यांमध्ये देशप्रेम जागृत व्हावे या उद्देशाने देशभक्तीपर गाण्यांवर विद्यार्थ्यांच्या कवायतो आयोजित कराव्यात.
विद्याध्यर्थ्यांमध्ये राष्ट्रनिष्ठा, एकता यासारखे गुण वाढीस लागावेत याकरिता विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण द्यावे; तसेच एन.सी.सी / स्काऊट गाईडच्या धर्तीवर विद्यार्थ्यांची परेड आयोजित करावी.
विद्यार्थ्यांच्या शारीरिक सुदृढतेसाठी त्यांच्याकडून योगासने, व्यायाम व तत्सम शारीरिक कसरती करून घ्याव्यात.
४) माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन :
शासन परिपत्रक संदर्भ क्र. २, दि. १ ऑक्टोबर, २०२५ अन्वये, शाळा स्तरावर माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यासंदर्भात सूचित करण्यात आले आहे. शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करून त्यांचे अनुभव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावेत.
विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी असलेल्या माजी विद्यार्थ्यांची मार्गदर्शन सत्रे आयोजित करावीत. उदा. करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा, कला, क्रीडा, विज्ञान, जीवन कौशल्ये
अशा मार्गदर्शन सत्रांमुळे विद्यार्थी प्रेरित होऊन, त्यांना त्यांच्या करिअर निवडीस मदत होईल, हे पहावे.
५) शैक्षणिक सहली (स्थळभेट) :
स्थानिक परिसरातील किल्ले, ऐतिहासिक स्थळे, विज्ञान केंद्र, कारखाने, शेती प्रकल्प, उद्योग, संग्रहालये इ. ठिकाणांना वर्षातून किमान एकदा सहल आयोजित करावी.
सहलीपूर्वी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणाविषयी संक्षिप्त माहिती दिली जावी.
सहलीनंतर विद्यार्थ्यांकडून अहवाल लेखन, प्रस्तुतीकरण आणि चित्रदर्शिका प्रकल्प तयार करून घ्यावेत.
आयोजित सहलीदरम्यान विद्यार्थ्यांची सुरक्षा व सुरक्षितता याबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी.
६) क्षेत्रभेट (राष्ट्रीय शिक्षण धोरण आधारित अनुभवजन्य शिक्षण) :
राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांना अनुभवाधारित शिक्षण (Experiential Learning) देणे आवश्यक आहे.
याअनुषंगाने, शिक्षकांनी विद्यार्थ्यांकरिता पोस्ट ऑफिस, बँका, पोलिस स्टेशन, ग्रामपंचायत, नगरपालिका, ऐतिहासिक स्थळे, स्थानिक उद्योग इत्यादी ठिकणांना क्षेत्रभेटींचे नियोजन करावे.
अशा क्षेत्रभेटीदरम्यान विविध प्रक्रियेंचे प्रत्यक्ष निरीक्षण करून, विद्यार्थ्यांमध्ये विविध कार्यपद्धती, जबाबदाऱ्या, सार्वजनिक सेवा, दस्तऐवजीकरण, व्यवहार कौशल्य याविषयी समज विकसित होईल, हे पहावे.
७) वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन :
प्रत्येक शाळेत वर्षभरात किमान ३ विषयांवर वक्तृत्व / कथा सांगणे / वादविवाद किंवा काव्यपठण स्पर्धांचे आयोजन करावे.
विषय निवडताना देशभक्ती, पर्यावरण, विज्ञान, सामाजिक मूल्ये, लोकशाही, तंत्रज्ञान, आरोग्य, स्वच्छता इ. विषय प्राधान्याने समाविष्ट करावेत.
विद्यार्थ्यांना मौलिक भाषण, मराठी भाषेची शुद्धता, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण, वेळेचे नियोजन आणि अभिव्यक्ती कौशल्य विकसित करण्यावर भर द्यावा.
विजेत्यांना प्रमाणपत्रे देऊन प्रोत्साहन द्यावे.
८) लघु उद्यम महोत्सव (व्यवसाय शिक्षण उपक्रम) :
विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्ये, पैशाचे व्यवस्थापन, मोलभाव, विक्री कौशल्य आणि ग्राहक वर्तन समजणे यासाठी हा उपक्रम राबवावा.
विद्यार्थी स्वतः भाजीपाला, हस्तकला वस्तू, घरगुती खाद्य पदार्थ, पुस्तकांची देवाणघेवाण, पुनर्वापर साहित्य इ. वस्तूंची छोटी दुकाने लावतील.
विद्यार्थ्यांना खरेदी-विक्री, नफा-तोटा, लेखापद्धती याबाबत प्रत्यक्ष व्यावहारिक अनुभव द्यावा.
शक्य असल्यास हा उपक्रम आणि पालक मेळावा एकाच दिवशी आयोजित करावा.
२. वरील उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, संवाद कौशल्य, सामाजिक जाणीव, शारीरिक-मानसिक विकास, आर्थिक साक्षरता आणि व्यावहारिक जीवन कौशल्ये विकसित होतील.
३. प्रत्येक शाळेने या सर्व उपक्रमांची वार्षिक अंमलबजावणी रूपरेषा तयार करून कार्यवाही अहवाल जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) यांचेकडे सादर करावा.
४. तसेच आयुक्त (शिक्षण) यांनी विभागाच्या संकेतस्थळावर एक लिंक उपलब्ध करून द्यावी आणि शाळांनी या उपक्रमांची माहिती या लिंकवर भरावी.
५. 'आनंददायी शनिवार' या उपक्रमांतर्गत, उपरोक्त नमूद कृती कार्यक्रम/घटक उपक्रम आयोजित करणे हे राज्यातील सर्व शाळांसाठी अनिवार्य राहील; परंतु, आयोजित करण्यात येणाऱ्या कृती कार्यक्रम/घटक उपक्रमात सहभागी होणे विद्यार्थ्यांकरिता ऐच्छिक राहील.
६. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२५१२०९१८२३१७६१२१ असा आहे. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
TUSHAR VASANT MAHAJAN
( तुषार महाजन)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
संपूर्ण आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा
आनंददायी शनिवार व दप्तराविना १० दिवस शाळा उपक्रमाची अंमलबजावणी करणेबाबत..
संदर्भ:- १) शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण २०२४/प्र क्र १२६/ एम डी-४ दि. १४ मार्च २०२४
२) मा. संचालक, रा. शै. सं. व.प्र. प. महाराष्ट्र पुणे यांचे पत्र क्र.व्य.मा.व.सा.व्या.वि. कौ. शि./२०२४-२५/०३५९१ दि. २३.०७.२०२४
३) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे राज्यस्तरीय कार्यशाळेतील निर्देश दि. ०१/०८/२०२४
४) प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा. जा.क्र.: जिशिप्रसंछसं/2024-25/1468 दि.०२/०८/२०२४
५) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर यांचे जिल्हा गुणवत्ता कक्ष बैठकीतील निर्देश दि. १८/०९/२०२४
उपरोक्त विषयानुसार संदर्भ क्र. १ अन्वये राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळेमध्ये इयत्ता १ ते ८ मधील विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शनिवार उपक्रमाची अंमलबजावणी करणे व इयत्ता ६ वी ते ८ च्या विद्यार्थ्यांसाठी १० दिवस दप्तराविना शाळा या उपक्रमाची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. तरी यानुसार संदर्भ क्र. २ ते ४ नुसार राज्य मंडळाच्या सर्व शाळेमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी करणे सुकर व्हावे यासाठी आंनददायी शनिवार-कृतीपुस्तिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर पुस्तीकेमध्ये आनंददायी शनिवार व १० दिवस दप्तराविना शाळा या उपक्रमासाठी इयत्तानिहाय कृती सोदाहरण देण्यात आलेल्या आहेत. राज्य मंडळाच्या सर्व शाळेमध्ये आनंददायी शनिवार आणि इयत्ता ६ वी ते ८ च्या विद्यार्थ्यासाठी १० दिवस दप्तराविना शाळा या उपक्रमाची अंमलबजावणी करणे व अपेक्षित आहे.
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर यांचे जिल्हा गुणवत्ता कक्ष बैठकीतील निर्देशानुसार जिल्ह्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळेमध्ये आनंददायी शनिवार व दप्तराविना शाळा या उपक्रमाची प्रभावी अमलबजावणी व्हावी यासाठी प्रत्येक शनिवार निहाय कृती/ उपक्रम संदर्भातील नियोजन आराखडा सोबत देण्यात येत आहे. सदर नियोजन आराखडा प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक कक्षामध्ये दर्शनी भागात प्रदर्शित करून प्रत्येक शनिवारी स्तर / इयत्तेस अनुसरून कृती / उपक्रम हे सबंधित समन्वयक शिक्षक यांचे माध्यमातून अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. सदर आनंददायी शनिवार व दप्तराविना शाळा या अंतर्गत राबविलेल्या कृती । उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होऊन त्याची नोंद अहवाल शालेय स्तरावर ठेवणे व या संदर्भातील नोंद प्रत्येक शनिवारी https://forms.gle/ACBTynatQnZWsXg4A या गुगल लिंकमध्ये करणे अपेक्षित आहे. तरी मुख्याध्यापक यांनी यानुसार कार्यवाही होईल असे पाहणे अपेक्षित आहे.
तरी आपल्या कार्यक्षेत्रातील राज्य मंडळाच्या सर्व शाळेमध्ये सदर उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होईल या अनुषंगाने अपेक्षित कार्यवाही करावी. तसेच शाळा स्तरावरील बैठक, केंद्रस्तरीय शिक्षणपरिषद व तालुकास्तरीय बैठक यामधून सदर उपक्रमाचे वेळोवेळी अनुधावन करण्यात यावे
सोबत: १) संदर्भ पत्र व शासननिर्णय
२) आंनददायी शनिवार व दप्तराविना शाळा नियोजन/ अंमलबजावणी आराखडा ३) आंनददायी शनिवार व दप्तराविना शाळा मार्गदर्शक कृतीपुस्तिका
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
प्राचार्य
जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनग
जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर रिजिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर
प्रतः
1. मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे, यांना महितीस्तव सविनय सादर
2. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर यांना महितीस्तव सविनय सादर
3. मा. आयुक्त, महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर यांना महितीस्तव सविनय सादर
4. शिक्षणाधिकारी (योजना) जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर यांना योग्य कार्यवाहीस्तव सादर
राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये "आनंददायी शनिवार" हा उपक्रम राबविणेबाबत
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांकः संकिर्ण-२०२४/प्र.क्र.१२६/एस.डी.-४ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२
दिनांक :-१४ मार्च, २०२४.
प्रस्तावना:-
तर्कसंगत विचार आणि कार्य करण्यासाठी सक्षम असणाऱ्या तसेच करुणा, सहानुभूती, साहस, लवचिकता, वैज्ञानिक चिंतन, रचनात्मक कल्पनाशक्ती, नैतिक मूल्य असणाऱ्या उत्तम मनुष्यत्वाचा विकास हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा महत्त्वाचा उद्देश आहे. सध्याच्या काळात लहान वयातही विद्यार्थ्यांना ताण तणाव, उदासीनता, नैराश्य या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर शालेय जीवनात आनंददायी कृती असण्याची गरज प्रकर्षाने जाणवते. यानुषंगाने "आनंददायी शनिवार" हा उपक्रम राज्य मंडळाच्या सर्व शाळामध्ये इयत्ता १ ली ते ८ वी या इयत्तांसाठी राबविल्यास विद्यार्थ्यांची शिक्षणाची अभिरुची वाढीस लागेल, त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर चांगला परिणाम होईल. तसेच विद्यार्थ्यांच्या गळती व अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी होईल, विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपले जाऊन त्यांचें उत्तम अध्ययन व्हावे या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी "आनंददायी शनिवार" हा उपक्रम राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन परिपत्रक:-
विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्तन व जबाबदारी बाबत जागरूकता निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी, सहकार्य वृत्ती, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा, या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवार हा आनंददायी शनिवार हा उपक्रम राबविण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.
२. सदर उपक्रमाचा उद्देश खालीलप्रमाणे आहे.
१. विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे.
२. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, भावनिक कौशल्ये विकसित करणे
३. शालेय स्तरावर ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे
४. विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित करणे.
५. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व नैराश्येवरमात करण्याची क्षमता निर्माण करणे.
६. विद्यार्थ्यांची शिकण्याची तयारी खेळीमेळीच्या वातावरणातून करणे ३. आनंददायी शनिवार या उपक्रमामध्ये खालील कृतींचा समावेश असेल.
१. प्राणायाम / योग/ध्यान-धारणा / श्वसनाची तंत्रे
२. आपत्ती व्यवस्थापनातची मुलतत्वे व व्यावहारिक प्रशिक्षण
३. दैनंदीन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन
४. स्वतःच्या आरोग्याची रक्षण करण्यासाठी उपाययोजना
५. रस्ते सुरक्षा
६. समस्या निराकरणाची तंत्रे
७. कृती, खेळ यावर आधारित उपक्रम
८. Mindfulness वर आधारित कृती व उपक्रम
९. नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य वरील कृतींसोबत इतर तत्सम प्रकारच्या नाविन्यपुर्ण कृतींचा समावेश करण्याची मुभा शाळांना राहील.
४, आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवत असतांना प्रत्येक शनिवारी प्रचलित वर्गाऐवजी विद्यार्थ्यांचा शनिवार हा वरील कार्यपध्दतीनदवारे आंनददायी स्वरुपाचा होण्याच्या दृष्टिने आयुक्त (शिक्षण), पुणे व संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद यांनी एकत्रितपणे रुपरेषा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याबाबत कार्यवाही करावी.
५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०२४०३१४२०५००३९६२१ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(तुषार महाजन)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
वरील संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.








0 Comments