स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा उपक्रमाबाबत ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे पत्र

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा उपक्रमाबाबत ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे पत्र.


महाराष्ट्र शासनाचे ग्रामविकास व पंचायत राज विभागाने दि. 21/07/2022 रोजी काढलेला शासन निर्णय पुढील प्रमाणे. 


भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्यापासून होणार जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्यसंग्रामातील अज्ञात नायक क्रांतीकारक स्वतंत्र संग्रामत घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्या साठी चेतवलेले पुल्लिंग कायम ठेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी या उद्देशाने या दैदीप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी दिनांक 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने वरील पत्रानुसार सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. 

केंद्र शासनाच्या दिनांक 17 जुलै 2022 रोजी केंद्रीय गृहमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी तिरंगा कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी देशातील सर्व राज्याच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्यात आली होती. त्यामध्ये घरोघरी तिरंगा कार्यक्रमाबाबत काही महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या असून त्या पुढील प्रमाणे. 

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार घरोघरी तिरंगा कार्यक्रम दिनांक 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर तसेच सर्व शासकीय निमशासकीय खाजगीय स्थापना सहकारी संस्था शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वराज्याची उभारणी स्वयं स्फूर्तीने करणे अपेक्षित आहे. 

घरोघरी तिरंगा कार्यक्रमात दिनांक 13 ते 15 वे 2022 हे तीन दिवस घरोघरी तिरंगा फडकवताना दररोज संध्याकाळी झेंडा खाली उतरण्याची आवश्यकता नाही. कार्यालयांना यासंबंधी ध्वज संहिता पाळावी लागेल. 

राज्याच्या मागणीनुसार केंद्र सरकारकडून केवळ तिरंगा झेंडा उपलब्ध होणार असून त्यासोबत काठी मिळणार नाही काठीची व्यवस्था स्थानिक स्तरावर करावयाची आहे. 

घरोघरी तिरंगा कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचना व नियमावली बाबत लोकांमध्ये जनजागृती साठी स्थानिक स्तरावर माहिती शिक्षण व संवाद उपक्रमाचे आयोजन करावे त्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा माहिती अधिकारी यांची मदत घेऊन स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये बातम्या लोकल केबल रेडिओ चॅनल सोशल मीडिया होर्डिंग बॅनर इत्यादी मार्फत प्रचार प्रसिद्धी करावी. 

घरोघरी तिरंगा कार्यक्रमाचा प्रचार प्रसिद्धीसाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या आईची साहित्य उपलब्ध असून

 https://mahaamrut.org/Downloads.aspx

वरील लिंक वरून माहिती शिक्षण व संवाद आयटीसी साहित्य डाऊनलोड करावे व त्याचा यथोचित उपयोग करावा.

तसेच राज्य सरकारने केंद्र शासनाकडे मागणी केलेले झेंडे विभागीय आयुक्त कार्यालयाकडे प्राप्त झाल्यानंतर पुढे झेंडे गाव स्तरापर्यंत वितरणाची जबाबदारी कार्यक्रम झाल्यानंतर विक्री झालेले झेंडे यांचा निधी एकत्रित करण व विक्री न झालेल्या झेंड्याची माहिती व झेंडे संकलनाची जबाबदारी निवासी उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे देण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना जिल्ह्यातील झेंड्याची मागणी स्थानिक स्तरावर उपलब्ध तयार झेंडे व केंद्र सरकारकडून प्राप्त होणाऱ्या झेंडे यांची संख्या लक्षात घेऊन जिल्ह्यातील तळागाळातील लोकांपर्यंत झेंडा पोहोचेल याचे सूक्ष्म नियोजन करून अंमलबजावणी करावी.

या संदर्भात काही शंका असल्यास आपण राज्य नूडल अधिकारी आजादी का अमृत महोत्सव ग्रामविकास व पंचायत राज विभाग डॉक्टर राजाराम दिघे त्यांचे सहकारी श्री प्रफुल रंगारी व श्री अनंता मुद्गले यांच्याशी थेट संपर्क करू शकता. या उपक्रमासाठी नेमलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग हुतात्मा राजगुरू चौक मादाम कामा मार्ग मंत्रालय मुंबई यांना ई-मेलवर पाठवण्यात यावा.



 वरील संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.